Saturday, July 27, 2024

कांदा कापण्याच्या सुरीने भोसकून युवकाचा खून; सांडपाणी व कचरा टाकण्याच्या वादातून नांदेडच्या आंबेडकरनगर भागातील घटना, आरोपी अटकेत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहराच्या आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा सांडपाणी व कचरा टाकण्याच्या कारणावरून चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबरच्या रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकऱ्यासह अन्य संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आंबेडकरनगर भागात राहणारा यशपाल सोपानराव भिसे (वय ३६) हा श्रीनगर भागात अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाच्या खालील बाजूस दुकान चालवत असे.  त्याचा घराशेजारीच राहणारा अमोल आनंदा गोवंदे (वय 29) याच्यासोबत कचरा व सांडपाण्यावरून सतत वाद होत होता. या वादातूनच काल अमोल गोवंदे याने यशपाल भिसे यांच्यावर कांदा कापण्याच्या चाकूने भोसकून खून केला. या घटनेनंतर आंबेडकरनगर भागात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशपाल भिसे याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही तासाच्या आतच मुख्य मारेकरी अमोल गोवंदे याच्यासह अन्य संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!