ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
नांदेड– शहराच्या बाबानगर भागात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा भोसकून खून करून फरार असलेल्या तिघांना शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने रविवारी दि. २० मार्च रोजी रात्री उशिरा अटक केली. खून करून हे तीनही आरोपी तीन वर्षांपासून फरार होते. या तिघांनाही सोमवारी दि.२१ रोजी न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी सांगितली.
दि. १६ एप्रिल २०१९ रोजी सदाशिव उर्फ सदा आनंदा किरकन (वय २३) या युवकाचा शहरातील बाबानगर भागात खून करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आनंदा गुणाजी किरकन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीत जवळपास नऊ जणांवर सदाशिव उर्फ किरकनचा खून केल्याचा आरोप होता. त्यातील तीन जणांना पोलिसांनी पकडले होते. न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे.
खून प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू होता. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती काढून रविवारी रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतले. यात निखिल सुरेशसिंह चंदेल (वय २२) रा. बाबा नगर नांदेड, योगेश बंकटसिंह चंदेल (वय ३४) आणि गणेश बंकटसिंह चंदेल (वय ३४) दोघे रा. रामनगर जुना कौठा, नांदेड यांचा समावेश आहे.
तीन वर्षांपासून फरार असलेल्या तिघांना शिवाजीनगरचे पोलीस अधिकारी आणि अमलदारांचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, शेख लियाकत, संजय मुंडे, अटकोरे, राजकुमार डोंगरे यांचे कौतुक केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)