Saturday, July 27, 2024

भावकितील वाद, दोन पुतण्यांमधील वाद मिटविण्यास आलेल्या काकाने गमावला जीव; बिलोली तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

बिलोली- भावकितील वादातून पुतण्याने काकाचा जीव घेतल्याची घटना बिलोली तालुक्यात घडली आहे. दोन पुतण्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी त्यांचे काका आलेले होते, पण या दोघांच्या वादात काकालाच आपला जीव गमवावा लागला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी येथील संभाजी हणमंता बोडके ( वय ५७) यांचा मंगळवार दि.३१ रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घरी त्यांचा सख्खा पुतण्या उमाकांत बोडके याने विट डोक्यात मारून खून केला.

बिलोली तालूक्यातील आरळी येथील उमाकांत रामराव बोडके (वय २५) व मारोती लक्ष्मण बोडके (वय ३५) हे दोघे सख्खे चुलत भाऊ यांच्यात  कौटूंबिक वाद होत असे. मंगळवारी रात्री सुरु झालेला त्यांचा वाद मिटवण्यासाठी सख्खा काका संभाजी हणमंता बोडके ( वय ५७) यांनी मध्यस्ती करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या उमाकांत बोडके याने संभाजी बोडके यांच्याच डोक्यात विटाने जबर मारहाण केली. डोक्यात जबर मार लागल्याने काका संभाजी बोडके यांचा जागेवरच मृत्यू झाला.

मयताचे नातेवाईक मारोती लक्ष्मण बोडके यांनी बिलोली पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक सावित्रा रायपल्ले, बिट हवालदार शिंदे व चंद्रमूणी सोनकांबळे यानी घटनास्थळी पंचनामा करून, आरोपी उमाकांत रामराव बोडके याच्याविरुध्द भादवि ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कुंडलवाडी प्रा.आ.कें. येथे  मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे करत आहेत. मयत संभाजी बोडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!